सांगोला : ( Eknath Shinde ) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हात बढाकर आसमाँ छू लेंगे हम. अपनी हार को जीत में बदल देंगे हम, असे म्हणत शहाजी बापू पाटील यांना मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्द दिला आहे. आमदार, नामदार असूदे किंवा नसू दे एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) ज्यांच्या पाठीशी उभा आहे, त्यांना चिंता करण्याचे काही कारण नाही, असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सांगोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शहाजी बापू पाटील यांचे पुनवर्सन करण्याचे संकेत दिले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री संजय शिरसाट, प्रकाश आबीटकर, शंभूराज देसाई, आमदार समाधान आवताडे, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची उपस्थिती होती. आता एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) हे शहाजी बापूंना कोणती संधी देतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नेमके काय म्हणाले एकनाथ शिंदे ?
अनेकदा काम करूनही यश मिळत नाही, त्यामुळे निराश व्हायचे नसते. एखादी मॅच हरली म्हणून विराट कोहिलीची बॅट थंड पडत नाही. पुढच्या मॅचमध्ये दुप्पट वेगाने गोलंदाजांवर तुटून पडते आणि चॅम्पियन ट्रॉफी घरात येते, त्यामुळे शहाजीबापू चिंता करू नका. शहाजी बापूंसाठी मी एकच शब्द उच्चारतो, टायगर अभी जिंदा है. शहाजी बापूंना मी वाऱ्यावर सोडणार नाही. ‘हात बढाकर आसमाँ छू लेंगे हम. अपनी हार को जीत में बदल देंगे हम’, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शहाजी बापू पाटील यांना आणि त्यांच्या समर्थकांना साथ दिला. कार्यकर्ता हा काम करणारा असतो. त्याला हरण्याची किंवा जिंकण्याची पर्वा नसते. बापू तुमच्यावरचे लोकांचे प्रेम बघून एकदम ओके वाटतंय. आभार यात्रेच्या निमित्ताने सध्या राज्यात फिरतोय, त्यामुळे शहाजी बापूंना मतदान करणाऱ्यांचे मी आभार मानतो.
सांगोल्यात शहाजी बापू पाटील यांना यश आले नसले, तरी तेच जनतेच्या मनातील नेते आहेत, हे मला माहिती आहे. आमदार, नामदार असूदे किंवा नसू दे एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) ज्यांच्या पाठीशी उभा आहे, त्यांना चिंता करण्याचे काही कारण नाही, असे एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) म्हणाले. सांगोल्यात गणपतराव देशमुख आणि शहाजीबापू पाटील हे दोघेचे असतात. तिसरा कोणी नसतो, त्यामुळे अनेकदा काम करूनही यश मिळत नाही, त्यामुळे निराश व्हायचे नाही. लोकांनी मला काय दिले, यापेक्षा मी लोकांना काय दिले, हे लक्षात ठेवून काम करायचे असते, असेही ते म्हणाले.